Music लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Music लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, फेब्रुवारी १६, २०१०

सावली (Savali)


रमाबाई शिरोडकर या खुप मोठ्या गायिका असतात. त्यांची मुलगी सानिका अजुन एक विद्यार्थिनी राधा या दोघी रमाबाईकड़े संगीताचे शिक्षण घेत असतात. सानिका खुप सुन्दर गाते कारण घरात सतत सुरु असलेला अभ्यास तिच्या कानावर पडत असतोच आणि तिचा स्वताचा आवाज गोड असतो. रमाबाईला सानिकाची खुप जास्त स्तुती केलीली आवडत नाही. त्यांच्या मते लहानपणी खूप जास्त स्तुती केली तर चांगले नसते आणि सानिकाला अजून खूप रियाझ करण्याची गरज आहे.



सानिकाचे
वडील वनस्पतीशात्रातील मोठे प्राध्यापक असतात. ते रमाबाईला समजावतात कि तू सानिकाबरोबर खूप कडक शिस्तीमध्ये वागतेस त्यामुळे सानिकाला त्याचा त्रास होतो. सानिकाने गाणी म्हटली कि सगळे लोक म्हणतात, कि रमाबाईची मुलगी आहे चांगल म्हणणारच. आणि गाणं नीट जमले नाही कि म्हणतात कि रमाबाईची मुलगी असून गाणं जमत नाहीये. या सारख्या होत असलेल्या "comparison" मुळे सानिकाला एक प्रकारचा तिटकारा येतो.



त्यामुळे तिला आई बरोबर स्पर्धा करण्याची आई पेक्षा काहीतरी वेगळं करावे असे सतत वाटू लागते. त्या भरात ती घर सोडून एक Orchestra ग्रुपला सामील होते. त्यांच्या बरोबर गाणं म्हणू लागते. आई वडील दोघांना पण त्याचा खूप त्रास होतो. पण दोघेही मनाची समजूत घालतात, कि आता सानिका मोठी झाली आहे स्वताचे बरं-वाईट तिला समजत. सानिका विकी हे दोघे एक CD काढतात, पण त्याची काही खास विक्री होत नाही. त्यामुळे हे खचून जातात. शेवटी सानिकाला काहीतरी वेगळे करण्यात यश मिळते का, तिचा तिच्या आईबद्दलचा ग्रह बदलतो का हे बघा "सावली" मध्ये.



सिनेमा सुंदर आहे. त्यातील गाणी तर अप्रतिम आहेत. सगळे कसलेले कलाकार आहेत त्यामुळे सिनेमा उत्तमच झाला आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या पोटी जन्माला येण्याचे जसे फायदे तसेच तोटे देखील असू शकतात. सावलीत वाढण्यारा रोपाला किती मानसिक ताण सहन करावा लागत असेल हे यातून दिसते. पण सानिकाला असे सारखे का वाटत असते कि सानिकाची आणि तिच्या आईची स्पर्धा आहे हे मला नीटसे समजले नाही. कदाचित बालवयापासून सारखी आईसारखी तू आहेस असे सांगितल्यामुळे तिला त्रास होतो, असे वाटते.




सिनेमा बघण्यासारखा निश्चित आहे. सिनेमाचा शेवट देखील चांगला आणि वेगळा केला आहे. जरूर बघा. तुमच्या प्रतिक्रिया निश्चित कळवा.




Sanika is daughter of famous classical singer Ramabai Shorodkar. Sanika is undergoing music training with her mother along with another student Radha. Sanika has inherited talent for singing from he mother. Her father is a Botany professor in a college. Ramabai did not like anyone praising Sanika and feels she needs to work hard and earn her due credit.



Sanika develops hate for being compared with her mother or taken for granted as Ramabai's daughter. Whenever she does well, she gets to hear "After all she is Ramabai's daughter", and whenever it is not up to the mark, she will get to hear "she should do better, she is Ramabai's daughter". As she grows into a young lady, this hate and tension within the mother and daughter becomes unbearable to her and at a spur of a moment, she quits her home and joins an orchestra group.



Viki the group leader of the orchestra is a creative musician and is trying to establish in the industry. Sanika and Viki put in lot of efforts and bring out an music album, but unfortunately it does not fetch them good response or money. What happens next is better watched in the movie.




The movie is really good and worth watching. The songs by Swapnil Bandodkar are really good. It seems to be one of his early works. All the actors are good and in general the story is depicted really well, in Goa. The initially unsaid and then openly expressed tension between the two is picturized well. The characters are very well suited.





Cast

  • Reema Lagu रीमा लागु,
  • Pradip Velankar प्रदीप वेलणकर,
  • Amruta Subhash अमृता सुभाष,
  • Urmila Kanetkar उर्मिला कानेटकर,
  • Amita Khopkar अमिता खोपकर,
  • Anil Raikar अनिल रायकर,
  • Raju Naik राजू नाईक,
  • Swapnil Bandodkar स्वप्निल बांदोडकर


Director

  • Rajendra Talak राजेंद्र तालक

गायक: आरती टिकेकर अंकलीकर, देवकी पंडीत, आरती नायक, सावनी शेंडे, जानकी अय्यर






Link to watch online


मंगळवार, ऑक्टोबर २०, २००९

क्षण (Kshan)



"क्षण" म्हणजे निखील, निलांबरी आणि विहंग यांच्या आयुष्यात आलेल्या अविस्मरणीय क्षणांची गोष्ट.

निलांबरी आणि विहंग एकाच कॉलेजमध्ये शिकत असतात. तिथेच त्यांची खूप मैत्री होती आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. विहंगला कविता लिहिण्याचा आणि गाणं म्हणण्याचा छंद असतो. छंद असे म्हणता येणार नाही, तर त्यात त्याला गती असते. कविता आणि गाणी म्हणत असताना तो एका छोट्याश्या कम्पनीमध्ये नोकरी देखील करत असतो. निलांबरीचे आई वडील सधन असतात. जेव्हा निलाम्बरीच्या वडिलांना कळते कि निलांबरी आणि विहंगचे प्रेम आहे तेव्हा ते त्याला होकार तर देतात. पण विहंग थोड्या दिवसाने नोकरी सोडतो आणि निलूच्या वडिलांचे डोके संतापाने फिरते. ते निलूला विहंगबरोबर लग्न करायला नकार देतात. पण निलूचे विहंगवर खूप प्रेम असते त्यामुळे ती वडिलांशी भांडण करते आणि त्यातच वडिलांना हृदयविकाराचा झटका येतो. या प्रसंगाने घाबरून जाऊन निलू शेवटी वडिलांच्या आग्रहास बळी पडते आणि निखीलशी लग्न करते. निखील खूप मोठा बिसिनेसमन असतो. पैश्याला काहीच कमी नसते, तो निलांबरीवर खूप प्रेम देखील करत असतो. हे सगळे सुरु असतानाच निलूला खूप मोठा आजार होतो. थोडा हवापालट म्हणून निलू व निखील दुसऱ्या गावाला जातात आणि तिथेच विहंगची निलू बरोबर पुन्हा भेट होते. आता विहंग खूप मोठा कवी / गायक झालेला असतो.


आता बऱ्याच दिवसाने भेट झाल्याने खूप जुन्या गोष्टी आठवतात. विहंग अजूनही निलू सोडून गेली त्यात क्षणात अडकून पडलेला असतो. निलू, निखील आणि विहंग एकत्र येतात. निलूचा आजार खूपच वाढतो आणि ती या आजारातून बाहेर पडणार नाही असे निखीलला कळते. निलूला पण समजते कि आता आपण फार दिवसांचे सोबती नाही. परिस्थितीमुळे विहंगला सोडून गेल्याचे दुख तिला अजूनही त्रास देत असते. त्यामुळे ती निखील जवळ, विहंगबरोबर राहण्याचे थोडे "क्षण" मागते. पुढे काय होते हे तुम्हीच बघा "क्षण" मध्ये.

सिनेमा जरूर बघावा असा आहे. जरा वेगळी गोष्ट आहे. सिनेमा थोडा दुखद आहे असे म्हणायला हरकत नाही. सुबोध भावेची अक्टिंग मस्तच आहे. सगळ्यात जास्त आवडलेला प्रसंग म्हणजे जेव्हा निखीलला, निलूच्या आजाराबद्दल कल्पना येते आणि तो ते लपवण्याचा प्रयन्त करतो तेव्हा तो एका क्षणी हसतो आणि दुसऱ्याच क्षणी रडतो हा प्रसंग सुबोधने खूप चांगला रंगवला आहे. सिनेमातील गाणी म्हणावी तितकी मला आवडली नाहीत. फक्त शेवटचे गाणे खूप छान आहे. प्रसाद ओक आणि दीपा परब हे दोघांनी पण त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे.

या सिनेमाबद्दल व माझ्या मताबद्दल तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.




Kshan which literally means moment is a story about moments in lives of Nilu, Nikhil and Vihanga.

Vihanga is an performing artist, struggling to establish as a poet and singer. He has a day job and managing to perform in stage shows. Nilambari or Nilu is a college student few years junior to Vihanga and they fall in love with each other.

Vihanga and Nilu decide to talk to parents of Nilu once Vihanga manages to get a own house and for that he is also waiting for his promotion in job. But one day Nilu's father finds out about their love and invites Vihanga for discussion. He agrees for their marriage.




Vihanga decides to quit the job on Nilu's insistence when he was denied the promotion. He decides to concentrate on his music career. But this upsets Nilu's father and they has a heated argument with Nilu. In the process he suffers a stroke. He emotionally blackmails Nilu to forget Vihanga and agree to marry a person of his choice.

On Vihanga's birthday Nilu gives this bad news and walks away from his life forever. Vihanga is shattered and stuck to those moments in his life. Nilu is married to Nikhil and is trying to be happy with him. They have very good relationship with transparency between them.

Destiny brings them together while Nilu is suffering with an unidentified health condition. And soon they realise Nilu hardly has any time in here life. In her final days when Nilu realised that Vihanga is still stuck with their moments together, convinces Nikhil to lend of her final few moments to help attempt Vihanga to recover from his failed love life.

Though a popular love triangle, the storyline has a charm in it and a must watch if you like movies with a difference. All three main characters are well justified by Deepa Parab, Subodh Bhave and Prasad Oak.



Cast:



Director:





मंगळवार, जून ३०, २००९

बयो (Bayo)


"बयो" एका हरवलेल्या प्रेमाचे स्मरण...

ही आहे स्वातंत्रपूर्व काळातील एक दुखद प्रेमकथा. रावी आणि प्रसाद भारत सोडून इंग्लंडमध्ये दुतावासात नोकरीच्या निमित्यांने येतात. प्रसाद नोकरीमध्ये व नवनवीन गोष्टीमध्ये खूपच व्यस्त होतो आणि रावी खूपच एकटी पडते. तिच्या असे लक्षात येते कि याच घरात कोणा विश्वनाथला बयो नावाची स्त्री पत्र पाठवते आहे. पत्रामध्ये बयोच्या गावातील, तिच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट अगदी विस्तारून लिहिली आहे. सगळी पत्र अगदी मनाला भिडणारी असतात. रावी विश्वनाथाबद्दल दुतावासात चौकशी करते पण काहीच पत्ता लागत नाही. तिला समजत नाही कि "बयो" ला कसे कळवावे कि तुझी पत्रे विश्वनाथला पोचत नाहीयेत. ती सगळी पत्र क्रमवार लावून वाचून काढते. त्यात "बयो" च्या जीवनाचा सगळा पट उभा राहतो. त्याच दरम्यान तिच्या नवऱ्याची भारतात बदली होते. ते परत जातात तेव्हा रावी "बयो" ला जाऊन भेटते. तिला काही न लागलेले संदर्भ समजतात.

बयो हि एक मुस्लीम मुलगी असते. तिचे वडील स्वातंत्र सैनिक असतात. जेव्हा ब्रिटीश सैनिक त्यांच्यामागे लागतात, तेव्हा ते आपल्या मुलीला एका ब्राह्मण शिक्षकाकडे (अप्पा) सुपूर्द करतात. अप्पांनी लग्न केलेले नसते. ते एका अनाथ मुलाला वाढवत असतात. त्याप्रमाणे ते बयोला पण स्वताच्या मुलीप्रमाणे वाढवतात. हा अनाथ मुलगा म्हणजे विश्वनाथ. आता या दोघांचे प्रेम कसे होते, त्यांची ताटातूट का होते आणि पुढे विश्वनाथ व बयो दोघे भेटतात का हे जाणून घेण्यासाठी बघा "बयो" !!!

सिनेमा अत्यंत सुंदर आहे. जरूर बघावा. सगळ्या कलाकारांनी खूपच छान काम केले आहे. सिनेमातील गाणी ठीक आहेत. शास्त्रीय संगीताचे छोटे छोटे तुकडे अतिशय श्रवणीय आहेत.

Cast:
  • Shreyas Talpade श्रेयस तळपदे
  • Mrunmayi Lagu मृण्मयी लागू
  • Vikram Gokhale विक्रम गोखले
  • Mrunal Dev मृणाल देव
  • Yatin Karyekar यतीन कार्येकर
  • Milind Shinde मिलिंद शिंदे
  • Jayavant Savarkar जयवंत सावरकर
  • Bharati Acharekar भारती आचरेकर

Direction:
  • Gajendra Ahire गजेंद्र अहिरे

This is a sad love story in the early 1940s. Start of the story shows us a character "Bayo", who is writing letters to "Vishwanath". Apparently "Vishwanath" is not staying in the house where letter are going. Raavi and her husband Prasad, are staying in the house. Raavi is a sensitive writer. And is not doing anything as they are in England. Finally Raavi opens all the letters and reads them chronologically. After reading the letters Raavi understands, that "Bayo" is waiting endlessly for Vishwanath. And there must be a heartbroken story behind it. She becomes hysterical and sensitive about the character "Bayo" and decides to meet her when Ravi's husband was transferred back to India. When Raavi meets Bayo, the real life story of "Bayo" comes in front of us.

Bayo is a muslim girl, whose father is freedom fighter. His father requests a Brahmin Teacher to take care of his daughter. This teacher is not married and he has given shelter to "Vishwanath" And that is how the love story starts.

It is a very good movie. A must watch.

Bayo on MarathiTube