Uttara Baokar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Uttara Baokar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ऑगस्ट २१, २००९

शेवरी (Shevari)


विद्या आणि माया दोघीजणी एका खोलीत राहत असतात. माया एकदम आधुनिक तर विद्या एकदम घरगुती मध्यमवर्गीय मध्यमवयीन स्त्री. विद्याला नवऱ्याने सोडून दिलेले असते. त्यामुळे ती होस्टेल मध्ये राहत असते. माया आणि विद्याचे असे ठरलेले असते कि दर शनिवारी रात्री विद्याने दुसरीकडे राहायचे कारण मायाचे मित्र येत असतात.

एक दिवस विद्या ऑफिसमधून घरी येते आणि अचानक, तिला माया सांगते कि आज काहीहि कर पण प्लीज घरात राहू नकोस. रागारागात विद्या बाहेर पडते तिला वाटते कि आत्याकडे जावे, पण तिची आत्या नवऱ्याने सोडून दिले याबद्दल इतके बोलते कि विद्याला तिथे राहणे नकोसे होते ती तिथून परत फिरते. आणि मग रस्त्यावरून फिरताना तिला तिच्या जीवनात घडलेल्या सगळ्या घटना डोळ्यापुढे येतात. नवरा सुधीर, मला तुझा कंटाळा आला आहे असे सांगून सोडून देतो. मुलाला आईकडे नाशिकला ठेवले असते. त्यामुळे दर शनिवारी विद्या नाशिकला जाते. वहिनी आणि भावाला तिचे दर शनिवारी येणे आवडत नाही. पण ते तिला तसे स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. वयात येणारा मुलगा आईचे अति जास्त प्रेम सहन करू शकत नाही. तसे विद्याला एका प्रसंगातून जाणवते आणि ती अगदीच कोलमडून पडते.

ऑफिसमध्ये तिचा बॉस तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. एक आधार म्हणजे शिंदे. तो तिचा ऑफिसमधील सहकारी असतो. लग्न झालेला, पण तरीही त्याला विद्या आवडत असते. तो देखील त्याच्या जीवनाला कंटाळलेला असतो, आणि तो विद्या मध्ये एका मैत्रिणीचे रूप बघत असतो. या दोघांची मैत्री आणि विद्याचे शिंदे बद्दलचे मत, एकदम मस्त, बघण्यासारखे आहे.

सिनेमा चांगला आहे. नवऱ्याने टाकून दिल्याने अगतिक झालेली विद्या, परिस्थितीने गांजलेली विद्या, आधुनिक व्हावे कि आपल्या जुन्याच संस्कारामध्ये गुंतून पडावे या मध्ये गोंधळलेली विद्या अश्या अनेक भावछटा दाखवणारी विद्या खूपच सुंदर. नीना कुलकर्णीचे काम खूपच सुंदर. दिलीप प्रभावळकर शिंदेच्या भूमिकेत खूपच मस्त. रवींद्र मंकणी सुधीरच्या भूमिकेत मस्त. उत्तर बावकरने विद्याच्या आईचे काम छान केले आहे. सिनेमा एकदा बघावा इतका चांगला नक्कीच आहे. संपूर्ण सिनेमा फ्लँशबँक मध्ये आहे. पण फ्लँशबँकचा खूपच सुंदर उपयोग केला आहे.
Vidya and Maya are roommates in mumbai. Arrangement between them is that Vidya will not stay in room on Saturdays, as Maya's boyfriends visit her. One day unexpectedly Maya tells her to stay outside for a night. Vidya is unhappy with the situation, leaves the house and walks on the streets.

While walking she sees different things, meets few people and remembers her life story as a flashback. Vidya's husband Sudheer has left her without giving any reason. They have a teenage boy, Ashish, who is upset because of his parents separation. Vidya leaves her husband house, leaves Ashish with her mother in Nasik.

Her boss in office, tries to seduce her. She has a colleague Shinde, who helps her in many situations. She is unclear about his motive, goes to his house one day. And is surprised by the conservation and the situation she was in.

A very good movie. A fustrated, irritated and helpless Vidya, is acted very well by Nina Kulkarni. Character "Shinde" is played by Dilip Praphavalkar. All the character and their acting are very good. This movie has won the award for the innovative and intelligent cinema technique of flashback.
Cast
  • Nina Kulkarni नीना कुलकर्णी
  • Ravindra Mankani रवींद्र मंकणी
  • Dilip Prabhavalkar दिलीप प्रभावळकर
  • Mohan Agashe मोहन आगाशे
  • Meeta Vasishta मीता वसिष्ट
  • Uttara Bavkar उत्तरा बावकर
  • Shiwaji Satam शिवाजी साटम

Director
  • Gajendra Ahire गजेंद्र अहिरे

शुक्रवार, मे २२, २००९

नितळ (Nital)




कथा आहे "नीरजा कौशिक" या एका अत्यंत हुशार डॉक्टरची. नीरजा जरी एक हुशार डॉक्टर असली तरीही तिचे आयुष्य इतके सरळ सोपे नसते. तिला डागाळलेल्या चेहऱ्याचा शाप असतो. तिला कोड असतं आणि ते मुखत्वेकरून चेहरा आणि हात यावर असतं. तिच्या हुशार, मनमिळावू, प्रेमळ स्वभावाच्या प्रेमात "अनन्या रानडे" पडतो. तो तिला बंगलोरहुन पुण्याच्या घरी घेऊन जातो आणि मग रानडेच्या कुटुंबात जे वादळ सुरु त्याचे यथार्थ चित्रण या सिनेमात केले आहे.

अत्यंत पुरोगामी विचाराचे रानडे खरंच किती पुरोगामी असतात याचे दर्शन होते. घरात बरीच मंडळी असतात. सगळ्या लोकांच्या नीरजाला बघून वेगवेगळ्या प्रतिक्रिया होतात. नीरजाला घरी आणेपर्यंत ठाम असलेला अनन्या , घरीतील लोकांचा प्रतिक्रिया बघून खूप confused होतो. काय करावे आणि काय करू नये अश्या संभ्रमात पडतो. पण रानडेच्या घरातील नवीन पिढी नीरजाला समजावून घेते आणि तिचा स्वीकार करायला तयार असते. सिनेमाचा शेवट मात्र खूपच आशादायक केला आहे.


सिनेमातील लोकांच्या प्रतिक्रिया अगदी बघण्यासारख्या आहेत. प्रत्येक माणसाच्या स्वभावानुसार प्रतिक्रिया असतात. रीमा लागू (अनन्याची आत्या), नीरजाला तिचे डाग लपवायला सांगते तर नीना कुलकर्णी (अनन्याची काकू), रानडेच्या घरात कसे सौंदर्याला महत्व देतात ते सांगते. काही लोक तिचा स्वीकार करायला तयार असतात, पण प्रत्यक्ष सांगत नाहीत. अगदी वेगवेगळ्या दृष्टीकोनातून लोकांच्या कोडावरील प्रतिक्रिया दाखवण्याचा सर्वांगसुंदर प्रयत्न केला आहे. दीपा श्रीराम (अनन्याची आजी) नीरजाला स्पर्शाने ओळखत असते, त्यामुळे तिच्या दृष्टीने सौंदर्य हे दृष्टीत नसून स्पर्शात असते. त्याप्रमाणे नीरजा सुंदरच असते. नंतर तिला आलेली दृष्टी नीरजाला कसे स्वीकारते ते खरंच बघण्यासारखे आहे. विचारवंत रानडेंच्या भूमिकेत (अनन्याचे आजोबा) विजय तेंडूलकर आहेत.

नीरजा तिच्या लहानपणातील काही प्रसंग जेव्हा सांगते तेव्हा खरंच हृदय द्रवते. देविका दफ्तरदार ची नीरजा मनाला खूपच भावते. तिने या भूमिकेला अगदी योग्य न्याय दिला आहे. सिनेमामध्ये खूपच मोठे कलाकार आहेत व ते आपापल्या भूमिकेत छान शोभून दिसतात. दिग्दर्शकाने कलाकारांची निवड अगदी योग्य केली आहे. सिनेमातील ३ गाणी खूपच सुंदर आहेत. ओठावर घोळत राहतात.

या सिनेमात कोडाविषयी जागरुकता निर्माण करणे व लोकांचे मन स्वच्छ करणे हा उद्देश जर असेल तर तो अगदी सफल झाला आहे असा मला वाटले. अगदी नावाप्रमाणेच सिनेमा "नितळ" आहे. सिनेमा खूपच सुंदर आहे, अजिबात चुकवू नये असा. मला अजून बरेचदा बघायला आवडेल.

सिनेमाच्या विषयावर, माझ्या परीक्षणावर आणि कोडाच्या समस्याबद्दल तुमची मते जरूर लिहा. तुमच्या प्रतिक्रियांची अपेक्षा आहे.




A very thought provoking and intriguing movie on vitiligo. This is a story of a young and intelligent doctor "Neeraja kaushik" whose life is not so easy going because of vitiligo. she has white patches on her hand and face. Doctor is very humane by nature. Ananya Ranade falls in love with Neeraja. Both are working together in Bangalore. Ananya invites Neeraja, who is ophthalmologist to his house in Pune on pretext of examining his grandmother.

Before seeing Neeraja, all family members are very supportive Ananya and Neeraja's relationship. Neeraja comes with carefully choosed presents for each family members. As everyone sees her with Vitiligo, their reactions change. Everyone is taken aback by Ananya choice. After a while, some of them provide solutions to her white patches, some of them reject idea of their relationships. But the younger generation becomes friendly and accepts Neeraja.

The dilemma among intellectual and socially forward "Ranade" family is depicted here strongly. People in the family shows different reaction as per their nature. Reema lagu, who is an actress, suggests Neeraja for makeover. While Nina Kulkarni, who is most beautiful daughter-in-law, tells Neeraja about Ranade's perspective towards their daughter-in-law. Deepa shriram, who is blind folded due to operation, knows Neeraja by touch. So she do not consider her as ugly. But when she starts seeing Neeraja, whether she accepts her or not... should be seen in the movie.

Director has chosen all the characters carefully. All the actors have given justice to their cast. A very good movie indeed. For Non-Marathi audience also, I feel it is worth watching with English subtitles. All the songs in the movie are good

Do share your thoughts on movie, my review and the social stigma of Vitiligo.




Director
Cast