Sandeep Kulkarni लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Sandeep Kulkarni लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, जून ०६, २०१२

अंकगणित आनंदाचं (Ankaganit Anandacha)


आनंद प्रकाश कुलकर्णी हा मुंबईमध्ये एका बँकेत नोकरी करीत असतो. बायको रागिणी व मुलगा समीर असे त्रिकोणी कुटुंब खूप सुखात असते. समीरवर आनंदाचे निरतिशय प्रेम असते. त्याला मुंबईचे धकाधकीच्या जीवनात त्याला वाटते की त्याला खरा आनंद मिळत नाहीये. गावाकडील जीवन जास्त सुखी असेल असे त्याला वाटते व त्यामुळे तो रागिणीला म्हणतो की आपण गावीच राहून शेती करावी. आनंदला वाटते की वडिलांच्या हाताखाली शेती शिकावी व गावातच राहावे. अचानक आनंदच्या वडिलांची तब्येत बिघडते आणि ते त्याला गावी बोलावून घेतात. परंतु वडिलांचा मृत्यू अचानक ओढवतो, त्यामुळे शेती नीटशी शिकता येत नाही. वडिलांनी आनंदच्या शिक्षणासाठी शेतीवर बरेच कर्ज घेतले असते.

आता ती शेती सोडून जाण्याचे आनंदला नकोसे वाटते. पण शेती न शिकल्याने, याला शेतीत फारसा नफा देखील होत नाही. आता घर चालवण्यासाठी म्हणून बायको रागिणी एका शाळेत नोकरी करते. मुंबई मध्ये एका मोठ्या कंपनीत टीम लीडर असलेली इथे एका शाळेत १०००० रुपयासाठी नोकरी करते. त्यात देखील तिला ८००० रुपयेच मिळतात. शिवाय बरेचदा शाळेत जायला १-२ मिनिट उशीर झाल्यामुळे, लेट मार्क पण लागतो. व पैसे कापल्या जातात. रागिणी नोकरी करत असल्याने, समीरला जोशी काकूंच्या पाळणाघरात ठेवण्यात येते. रागिणीच्या आईला त्यांचे असे मुंबई सोडून जाणे अजिबात पसंत नसते. तरीपण रागिणी समीर आणि आनंदवर असलेल्या प्रेमापोटी गावी येते.

पण अप्पा गेल्यानंतर व शेती जमत नसताना उगाचच गावी राहून कर्ज बाजरी होतो त्याचे रागिणी दुख व राग असतो. त्यात शेती करताना त्याचे उसाचे उत्पादन एक अहलुवालिया नावाचा मनुष्य खूप पैसे देईन असे म्हणून लुबाडतो, त्यानंतर तर आनंद कडे अजिबातच पैसे उरत नाहीत. त्यामुळे या दोघांमध्ये सारखे वाद सुरु असतात. रागिणीची खूप चीडचीड होत असते. पण आनंदला वाटते की पैसा नसला म्हणून काय झाले आपण आनंदात आहोत. रागिणीला वाटते की आता या शेती करण्यात काही अर्थ नाही. एकतर आनंदची तशी काही फारशी मदत तिला होत नाही, शिवाय घर शाळा सांभाळले व शिवाय पुन्हा पैश्याची मारामार, त्यामुळे रागिणीला आता शहरात जावे असे वाटू लागते. रागिणीच्या शाळेत असणारा नेमाडे नावाचा क्लार्क रागिणीला त्रास देत असतो. एकदा तो लेट मार्क लागल्याबद्दल तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करतो, ती रागाच्या भरात त्याला दोन थोबाडीत देऊन ठेवते.

घरी आल्यावर आनंदला सांगते पण आनंद, रागिणीची बाजू घेण्याऐवजी, तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. हे बघितल्यावर रागिणी भयंकर चिडते व सांगते की आता तिने ती नोकरी सोडली आहे व ती मुंबईला परत तिच्या आईकडे जाते आहे. आनंद तिला समजावण्याचा पर्यंत करतो पण तो व्यर्थ असतो. रागिणी समीरला घेऊन निघते, तेव्हा आनंद, समीरला जाऊ देत नाही. रागिणी गेल्यानंतर तो त्याच्या घरी शेतीत मदत करणाऱ्या सुदामा नावाच्या नोकराला देखील काढून टाकतो कारण आता त्याला हे चैन परवडणारी नसते जेव्हा रागिणी सोडून जाते, तेव्हा आनंदचे डोळे अचानक उघडतात, तो नोकरी करण्याचे ठरवतो. आनंदच्या डोक्यावर कर्ज झालेले असते. त्यामुळे त्याची गाडी बँक जप्त करते. शिवाय लोन फेडण्याबद्दल त्याला एक-दोनदा जेल मध्ये देखील जावे लागते.

त्याच्या नशिबाने त्याला नोकरी मिळते, पण त्यात गोम अशी यासाठी कि १०० दिवस काम करायचे, पण पगार मिळणार नाही. १०० दिवसाने जर चांगले काम केले तर महिन्याला १५००० रुपये मिळतील. आनंदकडे काहीच पैसे नसतात, त्यामुळे तो विचारात पडतो की हे गणित जमवायचे कसे, त्यात हिशोब केल्यावर त्याला असे वाटते कि ३ महिन्याला लागतील इतके पैसे शिलकीत आहेत, ते वापरून नोकरी घ्यावी. पण रागिणी कडे मुंबईला न जाता गावीच राहून आनंद मिळवावा व जीवनाचे अंकगणित सोडवावे. आनंदला त्याच्या जीवनातील आनंद व अंकगणित याची सांगड घालता येते का हे बघा "आनंदाचे अंकगणित" या सिनेमा मध्ये. आनंदाचे अंकगणित असे नाव का दिले असावे असा विचार मनात येतो. कारण हे आनंद या व्यक्तीच्या जीवनातील गणित आहे की आनंद मिळवायला लागणारे जे गणित असते ते गणित या सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हे नीटसे समाजात नाही. माझ्या मते सिनेमा अत्यंत बेसलेस आहे. नक्की या सिनेमात काय दाखवायचे आहे हे समजत नाही. म्हणजे मुंबईला नोकरी करताना कंटाळा येतो म्हणून आनंद शेती करायला गावी येतो, पण पुन्हा नोकरी करणारे लोक कसे सुखी आहेत हे बघून नोकरी करायला लागतो. बायको सांगत असते की शेती वगेरे आपल्याला जमणाऱ्या गोष्टी नाहीत तरी तिच्याकडे दुर्लक्ष करून शेती करतो व बायको सोडून निघून गेली म्हणून व स्वत: हलाखीच्या परिस्थितीत असताना, मुलाला बायको कडे न पाठवता उगीचच काहीतरी उद्योग करत बसतो. एकूण नक्की काय करायचं या सिनेमातील हिरोला हे समजत नाही. एका भरकटलेल्या जहाजाचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे का ? अशी शंका येते. एकूण या कथानकातील अंकगणित मला तरी फारसे समजलेले नाही. चांगल्या कलाकारांचा अगदीच चुथडा केला आहे असे वाटले. सिनेमा बघू नये. वेळ वाया जाईल.

Anand Prakash Kulkarni was a bank employee in Mumbai. His wife is Ragini and son Samir. Small and happy family. Anand loves Sameer a lot. He feels the busy Mumbai life is putting a lot of stress on him and on the whole family in general. He thinks life at his town will be less stressful and happy. He initiates discussion with Ragini, about shifting to the villages and farming. He decides to learn farming from his father and stay in his town. While he is thinking about it, his father is unwell and he had to rush. Unfortunately his father passes away and Anand did not get time to learn farming from him. At this point Anand decides to farm rather than going back to his job. But since he does not know farming well, he is not very good at that and not able to make much money. To help him financially, Ragini takes a job in a high school. She was team leader in a corporate company earlier. Here her salary is merely 10K and the fraudulent school administration takes another 2K cut and at end of month she gets only 8K in hands. Since Ragini is working, their son Sameer is in  day care facility after school which is run by Mrs Joshi. 

Ragini's mother is not happy with this change in her life. But Ragini wants to support Anand so she decides to do all this for him. But Anand's failure to generate substantial income from agriculture due to no proper training is bothering her. During these days a person named Ahulwalia cheats him for big amount of money, in sugarcane deal. Anand is under raising burden of loans. This is more and more disturbing for Ragini and they frequently fight. Anand still keeps insisting that even without money they are leading happy life. Ragini makes it clear to Anand that he should stop spending time and money on agriculture and rather do something else. Financially Anand is not getting anything out of it and Ragini is under severe stress in school, and also has to do lot of work in home to keep things moving. She start thinking they should rather go back to city and find better jobs there.

A clerk called Nemade is a troublesome guy in Ragini's school. He is always trying to catch Ragini, and one day when she was bit late for signing the attendance he crosses the limit. Ragini gives him a tight slap and decides to quit her school job at that moment itself. While discussing with Anand, he tries to convince her that she should have taken it cool and the job is important for her. Ragini looses temper that moment, decides to quit all this and stay with her mother in Mumbai. When she actually try to leave with Sameer, Anand stops Sameer and Ragini leaves alone.

After this Anand really starts thinking about his life. He has to remove his domestic assistant Sudama. And finally he decides to take up a job. Due to non payment of loan bank confiscates the vehicle and Anand is in real trouble now.

He manages to get a job, but with a very strange condition, that he will not receive salary for first 100 days and he may not get to work all days. He does lot of calculations and decides he can barely manage for those 100+ days with whatever money he has in his account and will try be happy with Sameer in his town only. So he decides to give it a try. If he is able to do that successfully or Ragini needs to intervene needs to be seen in "Ankaganit Anandache"

Looks like in the title of the movie "Anand" is used in two senses, name of lead character Anand and happiness. The movies storyline is very average and the script is not impressive. The take home message for the movie is very vague and may be interpreted in different ways. He initially quit job to to work on farm, but after a while takes a job and tries to be happy and prove his point. When Ragini tells Anand that farming is not suitable profession for him, he did not listen, but in the end lands up with a job but again in his small town instead of staying with Ragini in Mumbai. When he was in real financial trouble, he keeps his son with him and make him suffer too, when he could have taken good care of him by sending his son to his wife. The director has failed to utilize some really good talent like Sandeep Kulkarni, Aishavarya Naarkar and Sulabha Deshpande.


 Cast
Direction
  • Girish Kolapkar गिरीश कोळपकर

मंगळवार, मे ३१, २०११

डोम्बिवली फास्ट (Dombivali Fast)


माधव श्रीधर आपटे हा एक मध्यमवर्गीय नोकरदार माणूस. बँकेत नोकरी. रोज सकाळी त्याच वेळेस उठणार, तीच लोकल पकडणार, बँकेत जाणार त्याच प्रकारचे काम करणार, संध्याकाळी घरी येणार. घरी आल्यावर मुलीला प्रेमाने जेऊ घालणार, मग झोपणार. रोजचा तोच कार्यक्रम. त्यात काहीच फेरबदल नाही. यांना दोन मुलं प्राची आणि राहुल. राहुल मोठा आणि प्राची लहान. बायको नोकरी न करता घरीच गृहिणी असते. कारण माधव आपटे याला बायकोने नोकरी करू नये तर घरीच राहून मुलांवर संस्कार करावे अशी इच्छा असते आणि त्याप्रमाणे ती नोकरी करत नाही. घरात राहून, सारखी घरकाम करून वैतागते. त्यातून माधव आपटेची तत्व हीच डोकं खातात. खूप तत्वनिष्ठ असल्याने, लाच घेणे तर दूरच, पण लाच देण्याला पण नाकारत असतो. बँकेत नोकरी असल्याने तशी कमी काहीच नसते, पण अगदी उधळता येतील असे पैसे देखील नसतात. त्यामुळे जेव्हा राहुल तीन विषयात नापास होतो तेव्हा त्यामागील कारण नक्की काय याची राहुलला विचारणा होते. राहुल सांगतो कि कितीही अभ्यास केला तरी तो पास होणार नाही कारण त्याने त्याच्या शिक्षकाकडे शिकवणी लावली नाही. हे ऐकल्यावर बायको माधव आपटेच्या मागे लागते कि त्याला शिकवणी लावा. पण माधव आपटेच्या तत्वात शिकवणी म्हणजे लाच देण्याचा वेगळा प्रकार असेच असते. त्यामुळे तो त्याला नकार देतो.

खूप पैसे नसल्याने आपटे परिवार चाळीत राहत असतात, तिथे पाण्याचा प्रॉब्लेम असतो. तिथे रोज टँकरने पाणी येते. तो मुकादम, रोज लाच दिल्याशिवाय पाणी सोडत नाही. हे बघून माधव आपटे खूप वैतागतो.
ऑफिस मध्ये जातो, तर एक मोठा व्यापारी कागदपत्र न देताच लोनची मागणी करतो. माधव म्हणतो कि कागदपत्र आणून दे लगेच लोन देता येईल. पण हा मनुष्य बँकेच्या मनेजर कडे जातो आणि मॅनेजर
त्याचे लोन मान्य करतो. हे बघून माधव आपटेला खूप संताप येतो.

त्याच्या मुलीला शाळेत प्रवेश घ्यायचा असतो. तिथे शाळेची प्राध्यापिका, प्राचीला प्रवेश द्यायला तयार होते पण सांगते कि जर तुम्ही ३५००० रुपये डोनेशन दिले तरच प्रवेश दिला जाईल. सकाळपासून झालेल्या घटना बघितल्या तर माधव आपटेला एक सुसूत्रता दिसते. वेगवेगळ्या रुपात लोक काय करत आहेत, तर लाच मागत आहेत. कोणालाच कशाचीच मुल्ये शिल्लक राहिलेली नाहीत. माधव आपटे या डोनेशनला नकार देतो आणि आपटे परिवार घरी येतो. चांगल्या शाळेत प्रवेश डावलला गेला, कारण माधव आपटेने डोनेशन दिले नाही याचे त्याच्या बायकोला खूप म्हणजे खूप राग येतो. ती रागाच्या भरात माधवशी खूप भांडते व माधवला म्हणते कि नुसती तत्व तत्व काय करत बसलात, काही करून दाखवले तर या तत्वाला अर्थ.

डोक्याने तापलेला माधव ऑफिस मध्ये येतो तर ऑफिस मध्ये सगळे जण, त्या व्यापाऱ्याने दिलेल्या भेटवस्तू घेऊन खुश असतात. माधवला खूप चीड येते. मग बाहेर जाऊन पाण्याची बाटली विकणारा जास्त पैसे मागतो, त्याने हा वैतागतो. की याची मेहनतीची कमाई लोक कसे लाटत आहेत. आणि संतापाच्या भरात माधव या सगळ्यांना धडा शिकवण्याचा प्रयत्न करतो. आणि माधव आपटेचे एक भयंकर उग्र रूप लोकांना दिसते. माधव आपटे प्रकरणात सुभाष  अनासपुरे नावाचा पोलीस अधिकारी लक्ष घालतो, या अधिकाऱ्याचे माधवच्या गुन्ह्याबद्दल काय मत होतं ? माधव आपटे सगळ्या लोकांना धडा शिकवू शकतो का? पोलीस त्याचा कसा बंदोबस्त करतात ? माधव आपटेच्या कृत्यांबद्दल लोकांचे काय मत असते हे बघा "डोंबिवली फास्ट" या सिनेमात.

सिनेमाचा शेवट खूप दुख दायक आहे. सिनेमातील सगळे प्रसंग मनाला भिडून जातात कारण सगळी सामान्य माणसे या अनुभवातून कधी न कधी तरी गेलेलीच आहेच. लाच दिल्याशिवाय कुठेच काही होत नाही, हे सध्या तरी आपल्या देशात अगदीच शक्य आहे. माधव आपटेचा, चित्र काढणाऱ्या मतीमंद मुलाच्या समोरील संवाद खूप उत्तम आहे. मतीमंद मुलाच्या समोर हे सगळे संवाद, म्हणजे भिंतीसमोर सगळे बोलल्यासारखे आहे. आणि खर तर तशीच परिस्थिती भारतात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न छान वाटला. माधव आपटेच्या तोंडी असलेले वाक्य "मान मोडून जगताना एखाद्याने मान वर केली तर ती मान आम्ही खाली दाबायची" खूप म्हणजे खूप आवडले.

संदीप कुलकर्णी आणि शिल्पा तुळसकर दोघेही उत्तम. सगळेच पोलीस वाईट नाही, शिवाय त्यांच्या सिस्टम मध्ये राहून देखील काही चांगल्या गोष्टी करू शकतात हे दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे. सिनेमा जरूर बघाच. बघितला नाही तर एक चांगला सिनेमा हुकला असे मी नक्कीच म्हणीन.

माझ्या लिखाणावर किंवा तुम्ही हा सिनेमा बघितला असल्यास व तुम्हाला काही नवीन वेगळ्या गोष्टी आवडल्या असतील तर प्रतिक्रिया जरूर लिहा.



Madhav Shridhan Apte, is a typical middle class working gentleman staying in Dombivali. He is working for a bank, and leading a routine life. Every day same time to wake up, catch the same local, same type of work in his bank, return by the same local train, spend some time with his daughter and sleep. A very repetitive life. His family consists of his wife, who is home maker, two children, elder son Rahul and younger daughter Prachi. He feels that his wife should not work but stay at home and spend time with kids to bring them up well. She is not very happy with the decision of always staying at home and doing the house work. Madhav is a very principled man and that is a bit too much. This is also bothering his wife form time to time. Because of his bank job, he is earning well, but does not have too much money too spend.

Rahul flunks in three subjects and Apte family is trying to get to reason for the consequence. Rahul discloses that even if he studies hard, he can not pass because the teacher expects every student to attend his extra tuition classes for extra money. Madhav's wife requests him to get Rahul in the process, but he does not agree to this because this is kind of bribe which is against his principle.

Next incidence is Madhav is living in a chawl, which always faces water shortage. Water is supplied by a water tanker, and the operator needs tidbits of bribe to release water for residents. This makes Madhav upset. On reaching office there was a big businessman demanding some loan, without completing formalities of the paper work. Madhav denies the processing. He goes to higher officer and gets the loan passed and shows off in front of Madhav. This is really annoying for Madhav.

Later Madhav goes to good school near his house for his daughter's school admission. The principal agrees to admit her in school but demands Rs. 35,000 as donation. Now Madhav is really upset with the way everybody is tying to get money from him as a common man. How bribe has become part of Indian life. He denies to pay the donation and Apte family returns home without the school admission. At this point his wife is really upset with him. She started a heated argument with Madhav and in the process says that these is no use just talking and living by principles, but he need to show what he can do with them.

Upset Madhav on reaching his office is greeted by all his collegues very happy and busy looking at the gifts the same big businessman has given for passing his loan. He could not control his anger and decides to go out for awhile. Being summer time it is really hot outside and he goes to nearby stall to buy a bottle of water. When the seller demands two rupees more than the real price, Madhav looses his temper all together. He does something really unsual and scary that terrorize the whole Mumbai city for a while. Watch the movie Dombivali Fast to see what does he do ? How that affects several people ? What common man of Mumbai think about it ? What was Police department's reaction ? Was Madhav successful in his attempt to teach a lesson to all concerned ?

The movie ends with sad note. Many of the scenes are touching. These are kind of things happening in common man's life. The way the whole society has to pay bribe at every step and they have come to terms with it. There is an interesting scene where Madhav is talking to a mentallly retarded boy artist. Though Madhav is talking so much, the boy does not understand anything but Madhav fees so good because he could talk it out to someone. Some such scenes are really good.

Both Sandeep Kulkarni and Shilpa Tulaskar are very good in the movie. The police officer is also good, they tried to show in the movie how there are some good officers in the department and how they can contribute even within the system.

Do write your comments on the movie of you have seen it or on my writing of you have not.

Cast

Direction
  • Nishikant Kamat निशिकांत कामत


Link to watch online


बुधवार, मार्च १०, २०१०

मेड इन चायना (Made in China)


अप्पा जगदाळे खूप मोठे राजकारणी. यांची पिंपळगावला खूप जमीन असते. पुणे-मुंबई रस्त्यावर जर सेझ (स्पेशल इकॉनॉमिक झोन) आणला तर तेथील भागाची खूप प्रगती होईल व त्याचबरोबर स्वताला पण बरेच पैसे मिळतील, अश्या विचाराने अप्पासाहेब थडानी नावाच्या मोठ्या व्यावासिकाबरोबर हातमिळवणी करतात. आता याच भागात पिंपळगाव असल्याने तिथली जमीन मिळवणे पण सोपे होणार, आणि सगळ्या भागाचा विकास होणार या कल्पनेने सगळे लोक आनंदाने त्यांची जमीन विकतील असे अप्पासाहेबांना वाटते. अप्पाना एक मुलगी असते, तिचे नाव प्राची. प्राचीचे सगळे शिक्षण अमेरिकेत झालेले असते. अप्पांचे भाऊ, भाऊसाहेब जगदाळे, यांना २ मुले, दीपक व मोहित. दीपकला अप्पांनी स्वताबरोबर राजकारणात घेतले असते. व प्राची पण त्यांच्याकडे राजकारणाचे धडे घेत असते. दीपक हा बाहेरख्याली असतो, शिवाय त्याला जुन्या शस्त्रांचा संग्रह करण्याचा छंद असतो. दीपकचे त्याच्या बायकोबरोबर खास पटत नसते. इकडे मोहित व त्याची बायको निलांबरी हे दोघे खूप सुखी असतात. व निलूला दिवस गेले असल्याने दोघे खूपच खुश असतात.


मोहितने इस्त्रालय मध्ये जाऊन शेतीचे शिक्षण घेऊन इथे आधुनिक प्रकारची शेती करत असतो. व पिंपळगाव मधील सगळ्या शेतकर्यांना देखील आधुनिक शेतीचे ज्ञान देऊन तिथे खूपच प्रगती होते. तेथील माल एक्स्पोर्ट होत असतो. SEZ मुले आता सगळी जमीन थडानीला देणे मोहितला अजिबात पटत नाही.

याच गावात राहणारा अप्पांचा विरोधक कैलाश शिंदे याला देखील हि गोष्ट पटत नाही. आता थडानी सारख्या मोठ्या उद्योगपतीला तोंड द्यायचे म्हणून कैलाश त्यांच्या कार्यकर्त्यांकरवी हिंसेचा मार्ग अवलंबतो. जेव्हा जमिनीचा सर्वे करण्यासाठी जेव्हा लोक येतात तेव्हा हे कार्यकर्ते त्यांना चांगले बडवून काढतात. मोहित कैलाश बरोबर हात मिळवणी करायला जातो. कारण दोघांचा उद्देश एकाच असतो सगळ्या सुपीक जमिनी वाचवणे. पण कैलाश मोहितवर विश्वास ठेवत नाही. व दोघे आपापल्या मार्गाने अप्पाना सगळ्या जमिनी थडानीला देण्यात अडथळे निर्माण करतात. SEZ प्रकरण असे बरेच चिघळत जात असते, आणि चित्रपटाला एकदम कलाटणी मिळते. अप्पाचा एका मॉल मध्ये खून होतो. त्यामुळे SEZ प्रकरण जरा थंड होते व आता पुढे SEZ चे काय होणार असे वाटू लागते. पोलीस अप्पांच्या खुनाचा शोध घ्यायला येतात. या शोधात नक्की काय सापडते, कोणी खून केला असेल, सेझसाठी लागणाऱ्या जमिनी थडानीला मिळतात का हे बघा "मेड इन चायना" मध्ये.


सिनेमा ठीक आहे. SEZ म्हणजे नक्की काय हे या सिनेमातून नीटसे समजत नाही. SEZ नावाचे काहीतरी असते, हे फक्त कळते. सेझ हि संकल्पना चायनाने सुरु केली आहे त्यामुळे या सिनेमाला मेड इन चायना असे नाव देण्यात आले आहे. नावाकडे बघून असे वाटते, कि चीन मधून भारतात एक्स्पोर्ट होणाऱ्या गोष्टीमुळे नक्की काय होतंय, याचे चित्रण असेल, पण तसे काही होत नाही. पूर्वार्धात सुपीक जमिनी जाऊ नये, म्हणून शेतकऱ्यांचा लढा असेल अशी वाटणारी गोष्ट उत्तरार्धात रहस्यकथा वाटायला लागते. सोनीवर बघत असलेला CID कार्यक्रम बघत आहोत कि काय असं वाटू लागते. सिनेमात एकाच गाना आहे, आणि ते पण आता कशाला उद्याची बात चे रिमिक्स. ते काही खूप छान नाही. एकूण सिनेमा ठीक आहे. रहस्यकथा आवडत असेल तर बघावा असा. पण शेवटच्या काही मिनिटात आपण खुनी कोण आहे हे देखील ओळखतो.

अभ्यासू लोकांना जर SEZ बद्दल माहिती हवी असेल तर इथे लिंक दिली आहे. या सिनेमाला मेड इन चायना हे नाव का दिले आहे याचा शोध घेत असताना SEZ बद्दल बरीच माहिती मिळाली. हीच माहिती काही थोड्या संवादातून टाकली असते तर अधिक चांगले झाले असते.


Mohit Jagdale is a progressive farmer is Pimpalgaon. He is staying with his wife Nilambari and Grandmother. Appasaheb Jagdale, his uncle is Politician and Member of Parliament for the region. He is very renowned for his good developmental work in the region. He has one daughter Prachi, who has studied management abroad, and is back to Pimpalgaon to work with her father. Deepak is elder brother of Mohit, who is also in politics with his uncle Appasaheb. Deepak is characterless and treats his wife Yogita is unhappy due to this. Deepak has a hobby for collecting weapons and has a good collection of antic weapons and guns.


Appasaheb decides to get Special Economic Zone (SEZ) to his region, and develops ties with a businessman called Thadani. This needs a huge land of the order of 45 thousand acres for the project. This land needs to be procured from all the farmers of the region. So many families will loose their land and in turn their source of income. As part of the deal, Appasaheb is responsible to handle procurement of the land using his goodwill and political powers. Thadani on the other hand would invest in the infrastructure and develop the industries and townships.

Several people including Mohit are unhappy about this. Another major opposition is from Kailash Shinde, who is opposition politician in the town. His father has disappeared few years back, who was also opposing Appasaheb, and Kailash believes Appasaheb is behind his disappearance. He has a Agriculture supplies business and is worried if the lands are converted into industries, his business will close down. Both Kailash and Mohit have their own setsof supporters.


Bhausaheb, Mohit's father and Appasaheb's brother was a simple man, and respects farming then anything else. After his death Appasaheb supported Mohit and sent him to Israel for further training in agriculture. On his return he told him to take charge of the farmland and transform it into model agriculture. Thadani has been doing business in the region and has been major customer for agricultural and dairy products. Mohit has established modern dairy and poly-house for export oriented Flori-culture. With the new proposal his whole profession is in danger. So he tries to convince Appasaheb against the plan, but he faltly refuses and looses Mohit's respect.


Mohit tries to join hands with Kailash to protest against SEZ. But Kailash does not believe him and refuses to work with him. The whole issue is getting complicated and Appasaheb is killed by a shooter in a mall, while he was inaugurating it. The movie becomes a mystery at this point. Who is the killer ? What happens to the plan of SEZ ? Who succeeds Appasaheb in his political career ?

The movie starts with political movie with a theme of agriculture versus development. It touches issues like should a good fertile and well developed land be converted into industry ? Would people dependent of farmlands as their source of income, get decent jobs in the proposed industries or they will be left with labor jobs like sweepers etc. ? It it good idea to borrow concepts like SEZ blindly ?


It took some time for me to research and understand why the movie is named Made in China. The main concept of SEZ was developed and demonstrated successfully in China and was then copied by several other developing countries. More information on SEZ can be found here.

I would recommend you to watch the movie, if you enjoy Mystery movies and movies which make you think a bit. There is no powerful character role in the movie, though there are several renowned actors like Madhura Valankar, Sandeep Kulkarni, Milind Gunaji, Mrunal Kulkarni. Dr. Sharad Bhutadiya has justified his role in the movie well.


Cast
  • Sandeep Kulkarni संदीप कुलकर्णी
  • Milind Gunaji मिलिंद गुणाजी
  • Mrunal Kulkarni मृणाल कुलकर्णी
  • Upendra Limaye उपेंद्र लिमये
  • Madhura Velankar मधुरा वेलणकर
  • Deepshikha दीपशिखा
  • Dr. Sharad Bhutadiya डॉ. शरद भुताडिया
  • Shilpa Nawalkar शिल्पा नवलकर
  • Puja Naik पूजा नाईक
  • Uttara Bawkar उत्तरा बावकर
  • Anand Alakunte आनंद अलकुंटे
  • Kanchan Pagare कांचन पगारे

Director
  • Santosh Kolhe संतोष कोल्हे


Link to Watch online


Official website