2012 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
2012 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, सप्टेंबर ०७, २०१५

बदाम राणी गुलाम चोर (Badam Rani Gulam Chor)


सिनेमाची गोष्ट आहे तीन मित्रांची. तिघे मित्र एकाच मोठ्या घरात राहत असतात. घरचे नाव असते, "अनब्रेकेबल". यातील एकाचे टोपण नाव असते "चाकू". हा एका गॅरेज मध्ये नोकरी करत असतो. दुसरा असतो पुस्तक, हा एका कॉलेज मध्ये प्रोफेसर असतो. तिसरा असतो माकड, हा एका न्यूज चॅनेल मध्ये नोकरीला असतो. हे तिघे एकमेकांना टोपण नावानेच हाका मारत असतात. प्रत्येकाची अशी विचित्र टोपण नावे देखील त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे ठेवलेली असतात. चाकू हा कधी न सुधारणारा, बिनधास्त स्वभावाचा असतो. त्याचे असे नाव पडण्याचे कारण म्हणजे सगळ्या शस्त्रांची उत्क्रांती झाली. पण चाकू हा कायम चाकूच राहिला. चाकू हे पात्र देखील तसेच आहे. प्रोफेसर हा खूप पुस्तके वाचत असतो आणि कुठलीही गोष्ट कधीही चूक सांगत नाही, पुस्तकी ज्ञान नेहमी पाजळतो. तर माकड, हा न्यूज चॅनेल मध्ये असतो, तिथे कायम बातम्या मिळत नाही, तेव्हा बातम्या तयार करणे हा त्याचा मुळ स्वभाव असतो त्यामुळे त्याचे नाव माकड असे पडते. आता या चाकुला गाडी दुरुस्त करायला आलेली एक खूप आकर्षक तरुणी आवडू लागते व तो तिला घरी बोलावतो. ती या तिघांची नावे ऐकून सांगते की माझे नाव पेन्सिल. पेन्सिल म्हणजे जिने लिहिलेले कधीही पुसता येते, कायम असे काहीच नाही. कारण भूतकाळात केलेली कुठलीच विधाने ती लक्षात ठेवत नाही व त्याची जबाबदारी घेत नाही.

पेन्सिल घरात आल्यावर या तिघांच्याही मनात तिच्या विषयी ओढ निर्माण होते. खरेतर चाकूने पहिला नंबर लावलेला असतो. कारण तिला तो घरी यायला निमंत्रण देतो त्यावेळेस त्याने या दोघांना सांगितले असते की मला पेन्सिलीशी लग्न करायचे आहे. पण पेन्सिल घरी आल्यावर पुस्तक त्याच्या बुद्दीमात्तेच्या जोरावर चाकुशी वाद घालतो आणि म्हणतो कि जर का तू तिला अजून पर्यंत लग्नाबद्दल सांगितले नसशील तर मी देखील लग्नाच्या स्पर्धेमध्ये उभा आहे. चाकू सुरवातीला खूप चिडतो. पण नंतर सावरतो. एक दिवस सकाळी सकाळी अचानक पेन्सिल घरी येते. चाकू आणि पुस्तकाची स्पर्धा लागते, प्रथम चाकू म्हणतो कि मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तसेच लगेच पुस्तक देखील ते म्हणतो. पेन्सिल आश्चर्याने माकडाकडे बघते, माकड म्हणतो मला यात इन्टरेस्ट नाही.

मग माकड आणि पेन्सिल एक डाव रचतात. ते ठरवतात कि पेन्सिल, चाकू व पुस्तकाची परीक्षा घेईल. त्यासाठी पहिल्या दिवशी चाकुबरोबर, दुसऱ्या दिवशी पुस्तकाबरोबर व तिसऱ्या दिवशी चाकू व पुस्तक बरोबर दिवस घालवेल. आणि अशी दोन आवर्तने होतील. अर्थात परीक्षक म्हणून माकड बरोबर असेलच. या स्पर्धेमध्ये काही नियम असतील आणि त्या नियमांचे काटेकोर पालन होईल. स्पर्धेमध्ये पेन्सिल दोघांना काही प्रश्न विचारेल, त्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरावरून पेन्सिल कोणाशी लग्न करायचे ते ठरवेल. आता या स्पर्धेत काय होते व पेन्सिल कोणाशी लग्न करते, त्यानंतर पेन्सिलीच्या आयुष्यात काय बदल होतात, त्या बदलांमुळे दुसऱ्या उमेदवारांच्या मनात काय येते व तो काय प्लॅन करतो. माकड त्याच्या स्वभावानुसार कश्या बातम्या बनवतो. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला "बदाम राणी गुलाम चोर" या सिनेमात मिळतील.

या तीन मित्रांच्या स्टोरीबरोबरच राजकारणातील एक गोष्ट यात गुंफण्याचा यात प्रयत्न केला आहे. दोन प्रतिस्पर्धी, मुख्यमंत्र्याच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत असतात, त्यात जुन्या उमेदवाराचा पराभव होतो व नवीन उमेदवार निवडून येतो. व मग मिडिया कशी या दोघांना प्रतिक्रिया देण्यासा भाग पाडते. जनता या सगळ्या गोंधळात कशी पिचून गेलेली असते, हे यात गुंफण्याचा प्रयत्न केलेला आहे. सिनेमातील पात्रांची खरी नावे कळत नाहीत. सिनेमा मध्यंतरापर्यंत चांगला वाटतो. त्यातील काही विनोद चांगले वाटले. पण नंतर नंतर कंटाळा येतो. या सिनेमा सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेला आहे. यांनी २-३ खूप छान सिरीयल काढल्या होत्या त्यामुळे या सिनेमाकडून खूप अपेक्षा होती. पण ती अपेक्षा पूर्ण होत नाही. सगळे कलाकार त्यांच्या त्यांच्या भूमिकेत उत्तम आहेत. पण त्यांचा एकत्रित प्रभाव पडलेला नाही. एकूण सुरवातीला खूप उत्साहने सिनेमा बघायला सुरवात केली आणि शेवट पर्यंत उत्साह मावळून गेलेला होता. सिनेमा बघण्यास हरकत नाही पण खूप अपेक्षा ठेवू नये.

This is a story of three friends living together in a big house they names "Unbreakable". All three friends have nicknames. All the names are for a reason and describe their nature and behavior. First one is Chaku or Knife. He is car mechanic and own a garage. Second one is Pustak or Book. He is a studious person and works as a professor in a college. Third one is Makad or Monkey, who works for a news agency. All three call each other with the nicknames only.

Knife is called so because he is person who will not change and is not scared of anything. All the weapons have changed and improved, but knives have remained like they were for several centuries. Book is very studious and is always busy reading something. He is never wrong and has answer with reference for all the discussions. Monkey is working for news agency and when there are no news to cover he is good in making up the news.

Once Knife falls for a girl, who come to his garage for repairing her car. She is really cute and Knife likes her very much. He manages to invite her to his home. When she visits their home and was introduced to all three of them. She tells them that her name is Pencil, the reason being whatever she writes can be erased quickly and she does not care a dime about what she said the earlier day, and never take a responsibility of what she said earlier.

After meeting Pencil, all three are in the competition. Logically Knife is the guy, because he has met her first and invited her to their home. He has also made it clear before inviting her, to other two friends that he plans to propose her for marriage soon. But once Book meets Pencil, he starts using his intellect to convince Knife that since he has not proposed her already, Book also can jump into the competition. Knife is really upset with this situation, but then decides to take it cool. One day Pencil arrives to their home without notice. Knife immediately tells her that he want's to marry her. Book without wasting any time declares the same intention. Pencil loks at Monkey with surprise. Monkey just replies "I am not interested".

Then Monkey and Pencil get together and make a plan. They decide to test Knife and Book to decide who is suitable to marry Pencil. On day one Pencil will spend time with Knife on second day she will spend time with Book on day three she spend time with both Knife and Book. This will be repeated one more time. Monkey will be there all along to watch over. There will be some ground rules set and need to be followed very carefully. Pencil will ask few questions to both of them and take a decision based on all this.How does this whole plan work out, who does she decids to marry at the end, what does the other person do about it, how Monkey makes news stories out of it needs to be undestood and enjoyed by watching movie "Badam Rani Gulam Chor".

In this movie, with the story of these three friends there is another story woven, which is of two politicians. There are two leaders of opposing parties in the election, The ruling one gets defeated and a new chief minister takes charge. Monkey as a media man and his competitors are using different tricks to make news stories out of this. Interesting part of the story is we do not know the real names of all the four lead characters in the movie. The movie takes off really well and is very interesting and some good comedy, but after the intermission it kind of drags a bit. Satish Rajwade the director of the movie is well know and has delivered some really good TV serials. All the main characters are well known faces and good acting reputations. So finally the recommendation is good to watch with a caution of not so interesting till the end, so be prepared for a little disappointment.

Cast

Direction
  • Satish Rajwade सतीश राजवाडे 

मंगळवार, नोव्हेंबर ०५, २०१३

काकस्पर्श - एक विलक्षण प्रेमकहाणी



या सिनेमाची गोष्ट आहे स्वातंत्र पूर्व काळातील. सिनेमा हरी दामले आणि त्याच्या कुटुंबियां भोवताली व त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल आहे. बहुतेक सिनेमा हा फ्लॅशबॅक मधेच आहे. आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर, हरी दामले हा दामले कुटुंबियाचा कर्ता पुरुष असतो. पत्नी तारा, दोन मुली, एक मुलगा संकर्षण असा त्याचा परिवार असतो. घरात वकिली शिकणारा भाऊ महादेव, विधवा बहिण, नमुआत्या असा मोठा परिवार असतो. कोकणात बरीच जमीन आणि बागायत असते. हरी दामले याचा गावात देखील बराच मान असतो. तो तसा नवमतवादि असतो. नवनवीन संकल्पना तो उचलून धरत असतो, बरेचदा इतर लोकांचा रोष ओढवून देखील. हरीचा एक खूप जिवलग मित्र असतो, बळवंत फडके. हा सदैव देशाला स्वातंत्र कसे मिळेल याकरिता काम करत असतो. याच गावात उपाध्ये नावाचा एक ब्राह्मण असतो, ज्याचे हरी दामले बरोबर बरेच मतभेद असतात. शिवाय उपाध्ये हा एक अतिशय कर्मठ आणि जुन्या चालीरीती न सोडणारा, असा ब्राह्मण असतो.

वकिली शिकणारा भाऊ महादेव हा मुंबईला शिकत असतो. आता महादेव लग्नाचा झाला असल्याने, हरीदादा त्याच्या साठी स्थळ शोधतात. बळवंतच्या मध्यस्थीने, महादेवसाठी एक उत्तम स्थळ मिळते. मुलीचे नाव दुर्गा, दुर्गा चुणचुणीत, हुशार आणि चांगल्या गळ्याची, गोड गाणी म्हणणारी  असते. लग्न व्यवस्थित पार पडते. मुलगी वयात आलेली नसते, त्यामुळे अजून महादेव आणि दुर्गा यांचा तसा संसार सुरु झालेला नसतो. त्यात महादेवची परीक्षा जवळ येते त्यामुळे तो मुंबईला प्रयाण करतो. दुर्गा, जिचे नाव आता महादेवने उमा ठेवलेले असते, ती दामलेंच्या घरात रुळते. थोड्याच दिवसात उमा वयात येते, त्यानिमित्त्याने करण्यात येणाऱ्या गर्भादान / फलसंशोधन सोहळ्यासाठी महादेवला पाचारण करण्यात येते. महादेव मुंबईहून येतो खरा, पण त्याची तब्येत खूपच बिघडलेली असते. पूजेला देखील तो ग्लानीत असतो. त्याच दिवशी पहिल्या रात्री, उमाच्या जवळ पलंगावर त्याचे प्राणोत्क्रमण होते.

महादेवच्या मृत्यूने सगळ्या घरावर शोककळा पसरते. उमाच्या दु:खाला पारावार उरत नाही. १० व्या दिवशी पिंडदान करण्यासाठी हरी आणि गावातील इतर ब्राह्मण नदीकाठी जातात. परंतु पिंडाला कावळा शिवत नाही. सगळे लोक म्हणायला लागतात कि दर्भाचा कावळा करून पिंडाला शिवावावा, ही एकच शास्त्रात सांगितलेली पळवाट आहे. पण हरीदादाला ते मान्य नसते. हरी पिंडाच्या जवळ जाऊन काही तरी म्हणतो आणि त्याबरोबर पिंडाला कावळा शिवतो. आता दहा दिवस झाल्याने, उमाला सोवळी करण्याचा घाट घातला जातो. उमा खूप रडते, प्रतिकार करते, पण तिचे कोणी ऐकत नाही. नमुआत्या आणि तारा तिला जबरदस्तीने, नाव्ह्याच्या समोर देऊन बसवतात, तितक्यात हरीदादा पिंडदान करून परत येतो. घरातील प्रसंग बघून तो रागावतो आणि म्हणतो की उमाचे केस कापले जाणार नाहीत. गावातील सगळे लोक खूप टीका करतात. सगळ्या ब्राह्मण सभेमधून याचा प्रतिकार केला जातो. दामलेंच्या घरावर बहिष्कार टाकला जातो. पण तरीही हरी उमाला संरक्षण करण्यास मागेपुढे बघत नाही.

घरातील लोकांना हरीचे हे वागणे आवडत नाही, पण त्याला कोणी प्रत्यक्ष दर्शी विरोध करू शकत नाही. हरीला उमा आवडते आणि हरी त्यामुळेच उमाचे रक्षण करतो असे बरेच लोक बोलू लागतात. त्यात हरीची बायको तारा ही आजारी पडते. तारा आजारी पडल्यावर उमा घरातील सगळी जबाबदारी उचलते. अंथरुणावर खिळल्यावर ताराला देखील उमा आणि हरीच्या संबधाबद्दल शंका येऊ लागते. त्यातच तिचे निधन होते. मृत्युशय्येवर असताना, ती हरीला उमाशी लग्न करण्याचा सल्ला देते. पण हरी तसे करत नाही. गावातील लोकांच्या काहीबाही बोलण्यावर पडदा पडावा म्हणून, हरी त्याच्या मुलाचे लग्न करून देतो व घरात दुसरी बाई आल्याने, लोकांच्या वाईट बोलण्याला पट्टी बसते.  तर असे दिवस जात असताने, उमाच्या मनाला खूप यातना होत असतात, तिला हे आयुष्य नकोसे होते आणि ती जेवण करणे सोडते. तिच्या मरणासन्न अवस्थेत हरी तिच्या बोलतो, पिंडदानाच्या वेळेस बोललेले सत्य उमास सांगतो. ते सत्य काय असते, उमा आणि हरीच्या मनात एकमेकांबद्दल काय भावना असतात हे बघा "काकस्पर्श" या सिनेमामध्ये.

सिनेमा खूप सुंदर आहे. तसे बघितले तर अगदी सामान्य गोष्ट खूप सुंदर रीतीने सांगण्यात आली आहे. सिनेमा बघितल्यावर खरोखरच "एक विलक्षण प्रेमकहाणी" असे का म्हटले आहे ते कळते. सगळे कलाकार उत्तम आहेत. एकूण सेट, आणि चित्रण बघून आपण खरोखरच पूर्वीच्या काळातील कोकणात जातो. सिनेमा बघावा असाच आहे. पूर्वीच्या तरुण विधवा स्त्रीच्या व्यथा बघून जीव गलबलतो. सगळे कलाकार उत्तम. सिनेमाचा शेवट खूपच अनपेक्षित आहे. सिनेमात लहान मुलांनी बघू नये असा एकही सीन नाही, पण सिनेमा थोडा गंभीर आहे त्यामुळे लहान मुलांबरोबर न बघितलेला बरा.

This movie story line is set in pre-independent India. This is a story of Hari Damale and his family. Most of the story is in flashback. Hari Damale is taking care of his family after his parents, as they die early. His family consists of his wife Tara, two daughters and one son Sankarshan, his brother Mahadev who is studying law in Mumbai, and his widow sister, Namuatya. He owns farm land and orchards in konkan. He is well respected person in the village. He is a forward thinking person and pushes for change, at times even with some resistance from others. Balavant Phadake is his best friend. Balavant is involved actively in freedom fight. Another person in the village Upadhyay is not in good terms with Hari, reason being his orthodox and ritual nature. Upadhyay does not like Hari's modern thinking.

Mahadev, his brother is pursuing his law degree in Mumbai. Hari decides to get his brother married, since Mahadev has reached right age for marriage. Balavant gets a very good contact for the same. Durga is a bright young girl in his distant relation. Durga also knows singing and he thinks that Durga and Mahadev are perfect match. The marriage goes on well, he names Durga as Uma. Mahadev returns to Mumbai alone, since Durga is young yet, she is not sent with her. Mahadev also needs to concentrate on his exams and studies. Uma is getting used to the new place and people. She attains puberty and a ritual of Garbhadaan is planned. Mahadev has to be present for the same and he is called from Mumbai. Mahadev returns form Mumbai but with high fever. He manages to take part in the rituals, but during night his health deteriorates and he dies. 
Mahadev's death is a big shock for the whole family. Uma is the biggest victim. The rituals take place according to the traditions. In the Pindadaan ritual, Hari and others wait for long time for crows to touch the Pinda. There are rituals to avoid this ritual, but Hari is not in favor of making a false grass crow to do away with. Finally Hari goes to scene and promises something, and within few minutes crows come to eat the Pinda. At home, the ritual of Uma has to begin. Her head has to be shaved off as a widow. Namuatya is forcing Uma to shave her head, with help of a barber. Fortunately Hari returns in time, and saves Uma from this. He also announces that Uma will not have to shave her head. This attracts lot of criticism in the village, since this is not according to custom of the times. The village Brahman Sabha decides to stop any transactions with Hari's household.
Hari's family is disturbed, but they are not in a position to resist Hari. People started saying that Hari is in love with Uma and that is the reason he is protecting her. After few months of this tension, Tara gets sick. Uma is mature lady now and she really takes care of the house well. Tara too starts doubting the relationship between Hari and Uma. In her final moments, Tara requests Hari to marry Uma after her death, but Hari refuses. After Tara's death, Hari quickly gets his sone married, so that another lady comes to the house. This avoids people doubting his and Uma's relationships. But all these tense years in Uma's life take toll on her mental health. She is really fed up with her life and decides to die by stopping food. She gets really weak, and finally in those moments Hari tells her the reason he has been behaving like that, and what was the promise he made at the time on Pindadaan. The delicate relationship between Hari and uma is really shown very well in Kaaksparsha.
This movie is done very well with a very simple story. This is really a unusual love story. All the actors have done a very good job. The whole productions and set locations are really good and well matching with the story line and Konkan of the times. This a must watch movie and touching because of the problems ladies faced during that times. The movie ends in a very unexpected way. Movie is children friendly but could be bit taxing due to serious story line.

Do let us know your views.

Cast
  • Sachin Khedekar सचिन खेडेकर  - Haridada
  • Priya Bapat प्रिया बापट - Uma
  • Medha Manjarekar मेधा मांजरेकर - Tara
  • Savita Malpekar सविता मालपेकर - Namu Aatya
  • Vaibhav Mangale वैभव मांगले - Upadhyay
  • Sanjay Khapare संजय खापरे - Balwant
  • Abhijit Kelkar अभिजित केळकर - Mahadev
  • Manva Naik मन्वा नाईक - Shanti
  • Ketki Mategaonkar केतकी माटेगावकर - Small Uma
  • Kishor Raorane किशोर रावराणे - Janu
  • Gauri Ingawale गौरी इंगवले - Small Shanti
  • Saiee Manjarekar सई मांजरेकर - Kushi
  • Saksham Kulkarni सक्षम कुलकर्णी - Sankarshan
Director
  • Mahesh Manjarekar  महेश मांजरेकर 

Link to watch online